Ticker

6/recent/ticker-posts

'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर यांची थोडक्यात माहिती - माझा महाराष्ट्र

 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर यांची थोडक्यात माहिती - यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या.


वि.स. खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ साली महाराष्ट्रातील सांगली या गावी झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

त्यांना १९६८ साली पद्मभूषण पुरस्कार तर १९७४ ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात आला. वि.स.खांडेकरांचे पूर्ण नाव गणेश आत्माराम खांडेकर असे आहे. वि.स.खांडेकरांच्या अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ होती. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती खूपच तीक्ष्ण असल्याने, त्यांनी तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. वि.स.खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीवरचा प्रेम दिसून येतो. त्यांची माणसावरील अपार श्रद्धा त्यांच्या लेखनातून व्यक्त होते. "रूपक कथा" हा लेखनाचा नवा प्रकार त्यांनी नावारूपास आणला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशाने सुरुवात केली.

तर तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले. वि.स.खांडेकरांनी त्यांच्या जीवनात १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या. खांडेकरांनी अमृतवेल, ययाती, अविनाश, अश्रू आणि हास्य, अश्रू असे कितीतरी त्यांनी पुस्तके लिहली आहेत. 


(स्रोत- गूगल)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.