Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात माहिती ( भाग - १) - महाराष्ट्र माझा

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात माहिती ( भाग - १) - महाराष्ट्र माझा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


                    भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील महू या गावी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव आहे. लष्करात नोकरीत असणारे त्यांचे वडील पुढे साताऱ्यात स्थायिक झाले. बाबासाहेबांचे बालपण पूर्ण सातारा येथे गेले. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून बाबासाहेबांचे कुटुंब पूर्ण मुंबईला आले.इसवी सन १९०७ मध्ये  बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाली त्यानंतर १९१२ मध्ये  मुंबईच्या कॉलेजमधून ते बी.ए ची  परीक्षा पास झाले. त्यानंतर १९१३ मध्ये उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर १९१५ मध्ये बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठांमध्ये एम.ए ही पदवी घेतली. त्यानंतर त्याच विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पीएचडीची पदवी बहाल केली. अमेरिकेतील अभ्यास पूर्ण करून बाबासाहेब आंबेडकर कायदा व अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. परंतु आर्थिक अडचणीमुळे तेथील शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. काही काळ त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. त्याचवेळी त्यांनी सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदांमध्ये ते सहभागी झाले. इसवी सन   १९२० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बी.एससी. व डी.एससी. या संपादन केल्या. याच काळात त्यांनी बार ऍट लॉ म्हणजे बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली.१९२३ मध्ये भारतात परतले. मग त्यांनी आपले सार्वजनिक काम अधिक जोमाने सुरू केले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली. समाजसुधारणेचे कार्य करू लागले. इसवी सन १९२७ मध्ये मुंबई कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. येथून त्यांचा राजकीय जीवनात प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेबांच्या काळात भारतात चातुर्वर्ण, जातिभेद, अस्पृश्यता, सरंजामशाही या वाईट वृत्तींचे अधिराज्य होते. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी विचारांनी या समाजाचा प्राण्यांमध्ये फुंकर घालून चेतना आणली. त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार व न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यात जागृत केले. अस्पृश्य ही  याच  देशाचे नागरिक आहेत व या देशावर इतर नागरिक आहेत त्यांचाही तितकाच नागरिकत्वाचा अधिकार आहे. अशी भीमगर्जना बाबासाहेबांनी केली.

चवदार तळ्याचे पाणी सत्याग्रह
                 अस्पर्शाचे  हक्क प्रस्थापित व अधिकाऱ्यास प्राधान्य दिले. त्यांना पाणी भरण्यास मज्जाव असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्याचे डॉ. बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ ला महाडचा सत्याग्रह करून अस्पृश्यांसाठी खुले केले. त्यानंतर दोन मार्च १९३० रोजी नाशिक येथे काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश करता यावा म्हणून त्यांनी सत्याग्रह करून हिंदू मंदिरांची दरवाजे अस्पृश्यांना खुले केले. अस्पृश्यता व स्त्रीदास्य यांचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली. या सर्व प्रतीकात्मक कृतींमधून डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यांची अस्मिता जागृत केली व त्यांना सुधारण्याचा एक मार्ग दाखवला. त्यांच्या या प्रश्नांना न्याय देण्यात यावा यासाठी डॉ. बाबासाहेबांनी सर्वतोपरी अथक प्रयत्न केले. पण तरीही सर्वांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्माच्या प्रदीर्घ व सखोल अभ्यासानंतर डॉ. बाबासाहेबांना या धर्माची तत्वे पटली या धर्माचे श्रेष्ठत्व ज्या भगवान बुद्धांनी पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खूले केले त्या समतेवर उभारलेल्या बौद्ध धर्माची डॉ. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षा घेतली. त्यानंतर भारतीय राजकारणातही डॉ. बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली १९३० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंडमधील तीन गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. अस्पृश्यांसाठी राखीव जागा मान्य करणारा पुणे करार त्यांनी महात्मा गांधीजीं बरोबर केला. १९३७ मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. १९४३ बाबासाहेबांनी शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून अस्पृश्यांचे प्रश्न सोडविण्याचे बाबासाहेबांनी प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या घटना समितीचे सदस्य होते. तिच्या मसुदा समितीचे अध्यक्ष देखील होते. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना :भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हणून त्यांना ओळखले जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.